“Ayodhya Ram Mandir 2024” उत्खननात कोणते अवशेष मिळाले, जाणून घ्या राम मंदिराचा इतिहास.
नमस्कार मित्रांनो,
News24updates मध्ये आपले स्वागत आहे. जिथे आम्ही ताज्या बातम्या, नोकरी, देश-विदेश, अभिवादन, मनोरंजन, खेळ, सरकारी योजना, आरोग्य, Technology यांच्या संबंधित माहिती शेअर करतो. आम्ही तुम्हाला वर नमूद केलेल्या विषयांची उत्तम माहिती आणि ज्ञान देण्यासाठी समर्पित आहोत.आम्हाला आशा आहे की तुम्हाला news24updates वरील सर्व माहिती उपयुक्त वाटली आहे, कारण आम्हाला ती तुमच्यासोबत शेअर करायला आवडते.
Ayodhya Ram Mandir 2024
अयोध्या राम मंदिराचे काम वेगाने सुरू आहे अशातच मंदिराखाली अनेक पुरातन मुर्त्या आणि स्तंभ मिळाल्याचे समोर आले आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट चे सरचिटणीस चंपतराय यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून याची माहिती दिली. पण इथे असे अवशेष
सापडण्याची पहिलीच वेळ नाहीये या आधी सुद्धा ASI च्या म्हणजेच (आर्किऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या) उत्खननातून असेच काही अवशेष सापडले होते.
ASI ने पहिले उत्खनन केलं ते 1976 ते 1977 च्या दरम्यान या उत्खननात पुरातत्व शास्त्रज्ञांच्या पथकाला अनेक टेराकोटाच्या मानवी आणि प्राण्यांच्या मुर्त्या सापडल्या होत्या. नंतर त्या पुढचं उत्खनन झालं ते 2003 मध्ये यात सुद्धा प्राचीन मंदिराचे बरेच अवशेष ASI च्याच पथकाला मिळाले होते.
यावरून जुन्या रामचंद्र भूमी मंदिराची साधारण रचना ASI पथकाने त्यावेळेस मांडली, तसेच भारताचा आणि विशेष करून आयोध्याचा इतिहास पडताळून पाहता अनेकदा राम मंदिराचा उल्लेख दिसतो. हे जुनं राम मंदिर कसं होतं ते कोणी बांधल आणि आजवर या मंदिराचे कोणकोणते अवशेष आपल्याला सापडले आहेत, हे आपण जाणून घेणार आहोत. न्यूज24अपडेट्स ब्लॉग च्या माध्यमातुन,
पहिल्यांदा श्रीराम जन्मभूमी अयोध्येचा इतिहास जाणून घेऊ, प्राचीन काळात कौशल प्रदेश नावाचा एक राज्य होतं, त्या प्रदेशाची राजधानी होती अवध कालांतराने त्याला नाव पडलं “अयोध्या” भगवान श्रीराम यांचे पूर्वज विवस्वन यांचा पुत्र वैवस्वत मनु यांनी प्रथम अयोध्येला आपल राज्य स्थापन केलं.
तेव्हापासून ते महाभारत काळापर्यंत या शहरावर सूर्यवंशी राजांचाच राज्य होतं. इथे दशरथ राजाच्या महालात श्रीरामाचा जन्म झाला. महर्षी वाल्मिकी यांनी या अयोध्याची तुलना इंद्रलोकाशी केली एवढी अयोध्या त्यावेळेस संपन्न होती. असं म्हणतात की भगवान श्रीरामांनी जलसमाधी घेतल्यावर अयोध्या उजाड झाली होती.
पण जन्मभूमीवर असलेल्या राजवाडा तसाच होता, पुढे त्यांच्या मुलाने म्हणजेच कुश ने मात्र पुन्हा एकदा राजधानी अयोध्याची बांधणी केली. आणि यानंतर सूर्यवंशयाच्या पुढच्या 44 पिढ्यांनी इथे राज्य केलं सूर्यवंशयाचे शेवटचे राजा गृह बदल हे महाभारताच्या युद्धात अभिमन्यूच्या हाती मारले गेले. आणि अयोध्या पुन्हा उजाड झाली पण श्रीराम जन्मभूमीचा अस्तित्व मात्र कायम राहिलं.
‘पुढे साधारण इ.स.वी सन पूर्व 100 च्या काळात एक दिवस उजैन चा राजा चक्रवर्ती सम्राट विक्रमादित्य शिकार करत असताना अयोध्येला पोहोचले. विश्रांतीसाठी ते आपले सैन्यासोबत अयोध्यातल्या शरियु नदीच्या काठी असलेल्या एका आंब्याच्या झाडाखाली बसले, त्यावेळी अयोग्य हे जंगल होतं तिथे कोणतीही वस्ती नव्हती विश्रांती करत.
हे पण बघा – UPI Payment System मध्ये 1 जानेवारी पासून कोणते बदल ? जाणून घ्या
असताना राजा विक्रमादित्य यांना काही चमत्कार झाल्याचे जाणवलं, इथे काहीतरी देवी शक्तीचा वास असल्याचं त्यांना भासलं म्हणून त्यांनी तिकडच्याच काही योगी आणि संतांना याविषयी विचारलं, तेव्हा त्याला कळलं की ही श्रीरामाची अवध भूमी आहे. म्हणजेच अयोध्या आहे त्याच संतांच्या मदतीने राजा विक्रमादित्य यांनी इथे हळूहळू विहिरी, तलाव, महाल, आणि एक भव्य मंदिर उभारले, हेच ते मंदिर म्हणजे अयोध्या मधल श्रीराम जन्मभूमी मंदिर, सम्राट विक्रमादित्यने कसोटी नावाच्या काळ्या रंगाच्या दगडाच्या 84 खांबांवर हे भव्य मंदिर बांधलं होतं.
असं सांगितलं जातं या मंदिराची भव्यता खरोखर पाहण्यासारखी होती. विक्रमादित्य राजाच्या नंतर आलेल्या प्रत्येक राजांनी या मंदिराची वेळोवेळी देखभाल केली, त्यापैकी एक शृंग वंशाचे पहिले शासक पुष्य मित्र शृंग यांनी सुद्धा मंदिराचा जिर्णोद्धार केला होता. अयोध्याच्या एका उत्खननात पुष्यमित्राचा शिलालेख सापडला होता, ज्यात त्यांना सेनापती असं म्हटलं होतं.
या शिलालेखात पुष्यमित्रांनी या मंदिरात दोन अश्वमेध यज्ञा केल्याचा सुद्धा वर्णन केले आहे. त्यानंतर इ.स.वी. सन पूर्व 600 मध्ये अयोध्या हे एक महत्त्वाचा व्यापार केंद्र बनलं होतं, असं इतिहासकार सांगतात. त्यामुळे पाचव्या शतकात या ठिकाणाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली. आणि अयोध्या हे प्रमुख बौद्ध केंद्र म्हणून विकसित झालं.
तेव्हा अयोध्याच नाव साकेत अस ठेवण्यात आलं, असं म्हणतात की चिनी भिक्षु फाहियन यांनी येथे पाहिलेल्या अनेक बौद्ध मठांच्या नोंदी ठेवल्या होत्या. 7 व्या शतकात जेव्हा चिनी प्रवासी हिनसांग जेव्हा अयोध्येत आले तेव्हा त्यांनी सुद्धा आयोजित 20 बौद्ध मंदिर आणि हिंदूंचे एक भव्य मंदिर आहे जिथे हजारो लोक दर्शनासाठी येतात. अशी नोंद करून ठेवली आहे. यानंतर 11 व्या शतकात कनोट चा राजा जयचन अयोध्यात आला.
तेव्हा त्याने सम्राट विक्रमादित्य यांचे स्तुती करणारा शिलालेख काढून या मंदिरावर आपलं नाव लिहिलं, पानिपतच्या युद्धात जयचंद राजाचा अंत झाला. कालांतराने भारतावरचे मुघलांचे हल्ले वाढू लागले, या हल्ल्यात त्यांनी काशी, मथुरा, तसेच अयोध्या लुटली तिकडच्या पुजाऱ्यांची हत्या केली आणि मंदिरातल्या मुर्त्यांची सुद्धा तोडफोड केली.
पण एवढी आक्रमण होऊ नये श्री राम जन्मभूमीवर बांधलेले हे भव्य मंदिर 14 व्या शतकापर्यंत सगळी वादळ सहन करून तसंच टिकून होतं. तसंच सिकंदर लोधीच्या काळात सुद्धा अयोध्येत हे मंदिर अस्तित्वात असल्याची नोंद सुद्धा आहे. पण 14 व्या शतकात मुघलांनी भारताचा ताबा घेतला. आणि त्यांनी राम जन्मभूमी मंदिर आणि अयोध्या नष्ट करण्याच्या अनेक मोहिमा सुरू केल्या. शेवटी हे भव्य मंदिर 1527 ते 1528 च्या दरम्यान पाडण्यात आलं.
आणि तिथे बाबरी मज्जीत उभारण्यात आली. असे सांगण्यात येत अशा प्रकारे अनेक इतिहासकारांनी आणि राजांनी अयोध्येच्या या जुन्या राम मंदिराचा उल्लेख वेळोवेळी आपल्या संग्रहातून केला. त्यानंतर बराच काळ बाबरी मज्जीत चा मुद्दा सुद्धा तापला होता. 1976 ते 1977 च्या काळात या ठिकाणी बाबरी मज्जित असताना पहिलं उत्खनन झालं. या उत्खननात बाबरी मज्जितेच्या खाली राम मंदिराचे ठोस पुरावे सापडले.
“Ayodhya Ram Mandir” उत्खननात कोणते अवशेष मिळाले, जाणून घ्या राम मंदिराचा इतिहास.
मंदिरातल्या मुर्त्यांची सुद्धा तोडफोड केली. पण एवढी आक्रमण होऊ नये श्री राम जन्मभूमीवर बांधलेले हे भव्य मंदिर 14 व्या शतकापर्यंत सगळी वादळ सहन करून तसंच टिकून होतं.
तसंच सिकंदर लोधीच्या काळात सुद्धा अयोध्येत हे मंदिर अस्तित्वात असल्याची नोंद सुद्धा आहे. पण 14 व्या शतकात मुघलांनी भारताचा ताबा घेतला. आणि त्यांनी राम जन्मभूमी मंदिर आणि अयोध्या नष्ट करण्याच्या अनेक मोहिमा सुरू केल्या. शेवटी हे भव्य मंदिर 1527 ते 1528 च्या दरम्यान पाडण्यात आलं. आणि तिथे बाबरी मज्जीत उभारण्यात आली. असे सांगण्यात येत अशा प्रकारे अनेक इतिहासकारांनी आणि राजांनी अयोध्येच्या या जुन्या राम मंदिराचा उल्लेख वेळोवेळी आपल्या संग्रहातून केला. त्यानंतर बराच काळ बाबरी मज्जीत चा मुद्दा सुद्धा तापला होता.
1976 ते 1977 च्या काळात या ठिकाणी बाबरी मज्जित असताना पहिलं उत्खनन झालं. या उत्खननात बाबरी मज्जितेच्या खाली राम मंदिराचे ठोस पुरावे सापडले. ASI च्या पथकाला टेराकोटाच्या मानवी आणि प्राण्यांच्या मुर्त्या सापडल्या अशा मुर्त्या अर्थातच हिंदूं मंदिरात असतात अस त्यावेळी स्पष्ट झालं. तसेच या अवशेषांमध्ये काही कळस सुद्धा सापडले. बाराव्या तेराव्या शतकात बांधल्या गेलेल्या जवळपास सगळ्याच मंदिरांमध्ये असे कळस सापडतात.
कारण कलश हे हिंदू धर्मामध्ये समृद्धीचे प्रतीक मानलं जातं, त्यासोबत तिथे मशिदीचे असे 12 खांब सापडले जे मंदिराच्या अवशेषांपासून बनवले होते. ज्यावर मुर्त्या कोरल्या होत्या यानंतर दुसरे उत्खनन झालं, ते 2003 मध्ये तेव्हा बाबरी मज्जिद सुद्धा पाडली गेली होती. यावेळेस उत्खननात अजून काही महत्त्वाचे अवशेष सापडले. ऑगस्ट 2003 मध्ये ASI ने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाला या उत्खननाचा 574 पानांचा अहवाल सादर केला.
त्यानुसार या उत्खननाला ASI पथकाला पूर्व पश्चिम दिशेला अनेक विटांच्या भिंती, उत्तर दक्षिण दिशेला रंगीत फरशी, अनेक खांबांचे तळ आणि 1.64 मीटर उंच कसोटी या काळ्या दगडाचे तुटलेले खांब मिळाले. चार कोपऱ्यांवर पुतळे असलेले स्तंभ, तसेच दगडावर अरबी भाषेत लिहिलेल्या पवित्र श्लोकांचे शिलालेख सुद्धा सापडले, तसेच कोरीव काम केलेल्या विटा, दगड, विकृत मुर्त्या, पानांचे कोरीव दगड मिळाले.
दरवाजाच्या चौकटी सह अर्धवर्तुळाकार मंदिराचा स्तंभ कोरलेले कमळ उत्तरेला प्रांजेला असलेले गोलाकार मंदिर सुद्धा मिळालं. त्यानंतर अजून 50 खांब मिळाले, काही अशा भिंतींचे अवशेष सुद्धा सापडले ज्यावर मगरी कोरल्या होत्या, तसेच एक विष्णू हरी शिलालेख सुद्धा सापडला होता. यावरून प्राचीन कालचे श्रीराम मंदिर भव्य होतं आणि त्याला दोन सभागृह होती, असा अंदाज संशोधकांनी त्यावेळेस मांडला होता.
त्यानंतर आता पुन्हा मंदिराचे काही अवशेष मिळाले, राम मंदिर लवकरच भक्तांना दर्शनासाठी खुले होईल. आणि त्याचबरोबर प्राचीन काळातल्या मंदिराचे हे अवशेष सुद्धा भक्तांना पाहायला मिळतील. त्याचबरोबर आता बांधले जाणारे राम मंदिर सुद्धा आधीच्या राम मंदिर प्रमाणे भव्य बनवण्याचा प्रयत्न सरकार करते आहे. ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा